सरकारकडून देशात भांडवलशाही - आडम 

सरकारकडून देशात भांडवलशाही - आडम 

पुणे - ""सध्याच्या सरकारने भांडवलशाही अर्थव्यवस्था निर्माण केली आहे. यामुळे आर्थिक विषमता तयार झाली आहे. त्याच्याविरोधात बोलणाऱ्या लोकांना नक्षलवाद्यांच्या मार्गाने चालल्याची टीका केली जात आहे,'' असे मत माजी आमदार नरसय्या आडम यांनी येथे व्यक्त केले. 

दलित युवक आंदोलनातर्फे आयोजित केलेल्या पहिल्या सत्यशोधक मुक्ता साळवे साहित्य संस्कृती संमेलनाचे उद्‌घाटन आडम यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. संमेलनाच्या अध्यक्षा सरूबाई वाघमारे, कलावती तुपसुंदर, मुक्ता मनोहर, संतोष बगाडे, रमेश राक्षे, अंकल सोनवणे, वसंत साळवे आदी उपस्थित होते. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कृषी, आर्थिक आदींविषयक धोरणांचे उदाहरण देत आडम यांनी डॉ. आंबेडकर यांच्यामुळे देशातील कामगारांना भविष्य निर्वाह निधी मिळू लागल्याचे नमूद केले. सध्याच्या देशातील सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीवर त्यांनी चिंता व्यक्त केली. ""आर्थिक उदारीकरणाचे धोरण स्वीकारल्यानंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. आंबेडकर यांचे नाव घेणाऱ्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण अधिक आहे. नोटाबंदी, जीएसटीच्या अंमलबजावणीतून या सरकारने काय मिळविले. काळापैसा बाहेर काढण्याची घोषणा फोल ठरली. किती काळापैसा बाहेर आला याविषयी कोणीच बोलत नाही. आर्थिक फसवणूक करणारे विजय मल्ल्या, नीरव मोदीसारखे लोक परदेशांत पळून जातातच कसे,'' असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. 

असंघटित कामगारांना अद्याप संरक्षण दिले नाही. नोटाबंदीनंतर देशांत एक कोटीहून अधिक जणांची नोकरी गेली. रोजगारनिर्मिती करण्यात या सरकारला अपयश आले आहे. सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांना नक्षलवाद्यांच्या मार्गाने चालल्याची टीका केली जात आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी पुढील काळात दलित आणि श्रमिक यांनी एकत्र यायला पाहिजे. 
-नरसय्या आडम, माजी आमदार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com