राज्यकर्त्यांचे लक्ष देशाऐवजी खुर्चीकडे - शेकटकर

राज्यकर्त्यांचे लक्ष देशाऐवजी खुर्चीकडे - शेकटकर

पुणे - आपला शत्रू ताकद कशी वाढवतोय, याचा नीट अभ्यास केला पाहिजे; पण दुर्दैवाने आपले राज्यकर्ते देशाऐवजी खुर्ची सांभाळण्याकडेच अधिक लक्ष देतात, अशी खंत निवृत्त लेफ्टनंट जनरल डी. बी. शेकटकर यांनी मंगळवारी व्यक्त केली. 

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ आणि संवाद यांनी आयोजित केलेल्या "संवाद कलाकारांचा, संवेदना शेतकऱ्यांची' या संमेलनात शेकटकर आणि शेतकरी स्वाती शिंगाडे यांना "जय जवान-जय किसान पुरस्कार' विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, श्‍यामची आई फाउंडेशनचे अध्यक्ष भारत देसडला यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सचिन इटकर, सुनील महाजन, निकिता मोघे आदी या वेळी उपस्थित होते. 

शेकटकर म्हणाले, ""जवान, किसान यांच्याबरोबरच ज्ञान, विज्ञान या क्षेत्रातील व्यक्तींचाही आजच्या काळात सन्मान व्हायला हवा.'' शिंगाडे म्हणाल्या, ""भारत कृषिप्रधान देश असूनही शेतीकडे दुर्लक्ष होत आहे. तिला दुय्यम स्थान दिले जात आहे. हे चित्र बदलले पाहिजे. असे झाले तर शेतकरी वर्गातील नाराजी दूर होईल. नवी पिढी शिक्षण घेऊन शेतीत उतरली पाहिजे. शेतकऱ्यांचा सन्मान राखला गेला पाहिजे.'' संतोष चोरडिया यांनी सूत्रसंचालन केले. 

"जय जवान, जय किसान', अशी घोषणा लालबहादूर शास्त्री यांनी दिली; पण या घोषणेचा समाजाला विसर पडला आहे. स्वत: खडतर आयुष्य जगत जवान आणि किसान देशाची काळजी घेतात. त्यामुळे त्यांचा मान राखलाच गेला पाहिजे.'' 
- डॉ. पी. डी. पाटील,  कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com