प्लॅस्टिक बाटली बंद केल्यास सुमारे दोन लाख लोक बेकार

प्लॅस्टिक बाटली बंद केल्यास सुमारे दोन लाख लोक बेकार

पुणे - प्लॅस्टिक बाटली बंद करण्याचा सरकारचा विचार असल्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी नुकतेच जाहीर केले. या निर्णयामुळे सुमारे २ लाख कामगारांचे भवितव्य धोक्‍यात येणार असून, व्यापारी वर्गदेखील संकटात सापडणार आहे. सरकारने याचाही विचार करावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र बॉटल वॉटर मॅन्युफॅक्‍चर असोसिएशनने सरकारला दिला आहे. असोसिएशनचे अध्यक्ष विजयसिंह डुबल, दत्तात्रेय मारणे, विजय नवले उपस्थित होते.

डुबल म्हणाले, ‘‘असोसिएशनतर्फे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेतली असता यावर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. येत्या दोन दिवसांत पर्यावरणमंत्री रामदास कदम यांचीही भेट घेऊन निवेदन देणार आहोत.’’ 

राज्यभरात सध्या ९०० आयएसआयधारक युनिट कार्यरत असून, येथे सुमारे २ लाख कर्मचारी कार्यरत आहेत. तसेच व्यापाऱ्यांचे कोट्यवधी रुपये या व्यवसायात गुंतले आहेत. प्लॅस्टिक बाटली बंदचा सरकारने निर्णय घेतल्यास २ लाख नागरिक बेरोजगार होतील. त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येईल. या प्लॅस्टिक बाटलीचे रिसायकल होणे शक्‍य असतानाही सरकार त्या बंद करण्याचा निर्णय घेण्याची घाई का करत आहे? या निर्णयामुळे आयएसआय मार्क नसलेल्या जार मधील पाण्याच्या वापराचे प्रमाण वाढेल आणि त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या निर्णयाबाबत सकारात्मक विचार करण्याची गरज आहे, असेही डुबल यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com