प्रशासनात समन्वय राखून काम व्हावे: विवेक वळसे

प्रशासनात समन्वय राखून काम व्हावे: विवेक वळसे
प्रशासनात समन्वय राखून काम व्हावे: विवेक वळसे

टाकळी हाजी (ता. शिरूर, पुणे): जिल्हा परीषदाच्या माध्यमातून विविध योजनातून सर्वसामान्य जनतेचे आर्थीक धोरण उंचावण्याचे काम करण्यात येते. या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रशासन व पदाधिकाऱ्यांनी जबाबदारीने काम करणे गरजेचे असते. अधिकारी पद आणी पगारानी बांधिल असले तरी आम्ही जनतेच्या कौतूकातून विश्वास संपादन करण्यासाठी काम करत आहोत. सकारात्मक दृष्टीकोनातून प्रशासनात अधिकारी आणी पदाधिकारी यांच्यात समन्वय राखून काम व्हावे, असा सल्ला जिल्हा परीषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी दिला.

टाकळी हाजी येथे बापूसाहेब गावडे विद्यालयाच्या सभागृहात आंबेगाव शिरूर मतदारसंघातील शिरूरच्या 39 गावांची स्थानीक कामांची आढावा बैठक आयोजीत करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार पोपटराव गावडे होते. यावेळी जिल्हा परीषद सदस्या स्वाती पाचुंदकर, सुनीता गावडे, सवीता बगाटे, सभापती सुभाष उमाप, पंचायत समिती सद्स्य विश्वास कोहकडे, अरूणा घोडे, सवीता पऱ्हाड, सरपंच दामु घोडे, सहाय्यक गटविकास अधिकारी अशोक बांगर, तालुका आरोग्य अधिकारी आर. डी. शिंदे, रोहिदास येंदे, रामदास जगताप, निलेश बुधवंत, रामदास जगताप, बि. आर. गायकवाड, ग्रामसेवक, महिला बालकल्याण पर्यवेक्षीका, केंद्रप्रमुख, सार्वजनीक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थीत होते.

वळसे पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यासाठी गुणवत्ता वाढीस लागण्यासाठी एक शिक्षक, एक पुस्तक, आणी एक वही हा उपक्रम प्रायोगीक तत्वावर राबविला जात आहे. अंगणवाडी साठी वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून दर्जात्मक सुवीधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. स्त्रियांसाठी आहार व आरोग्याच्या सुवीधा निर्माण करण्याचे काम करत आहोत. पाणी साठवण साठी बंधारे तयार करण्यात येतील. शौचालय बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध असून लाभार्थ्यांनी त्यांचा फायदा घ्यावा. बोगस डॅाक्टरांवर कारवाई केली जाईल पण जिल्हा परीषदेच्या आरोग्य केंद्रात वैद्यकिय अधिकारी यांनी स्थानीक ठिकाणी रहावे. समाजासाठी काम करत असताना त्यांच्या गरजा ओळखून त्यांना योजनांची माहिती द्या. त्यातून राज्यात पुणे जिल्हा परीषदेचा नावलौकीक वाढीस लागण्यास मदत होणार आहे.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ग्रामसेवक संघघटनेचे अध्यक्ष श्रीकांत वाव्हळ यांनी केले. आभार केँद्रप्रमुख महादेव बाजारे यांनी मानले.

खरंच आहे का समन्वय...
लाखो रूपये खर्च करून रस्त्यांची कामे पुर्ण होत असताना स्थानीक पदाधिकाऱ्यांना माहिती नाही. अंगणवाडीच्या शाळांची कामे दर्जेदार नाहीत. आरोग्य केंद्रात वैद्यकिय अधिकारी रहात नसून काहि ठिकाणी पदे रिक्त आहेत. केंद्रशाळांमध्ये इ लर्नींगसाठी एकहि संगणक नाही. बहुतेक शाळेत विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला. जिल्हा परीषदेच्या योजनेत वस्तू अगोदर घेऊन नंतर अनुदान यामुळे लाभार्थी पाठ फिरवू लागले आहेत. शौचालयासाठी प्रत्साव नसल्याने शिरूर तालुक्यात 69 लाख अनुदान पडून आहे. ग्रामसेवक नव्याने द्या असे म्हणत पंचायत समितीच्या सदस्यांनीच नाराजी व्यक्त केल्यावर खरच आहे का समन्वय असा सुर या बैठकितून निघाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com