बारामतीच्या टंचाईग्रस्त भागात शिरसाई योजनेचे आवर्तन सुटले

baramati
baramati

उंडवडी : बारामती तालुक्याच्या जिरायती भागात शिरसाई उपसा जल सिंचन योजनेचे पाण्याचे आवर्तन नुकतेच सोडण्यात आले आहे. त्यामुळे या भागातील पाणी टंचाईग्रस्त गावाना दिलासा मिळणार आहे. 

बारामतीच्या जिरायती भागात ऑगस्ट महिना संपत आला तरी देखील अद्यापही दमदार पाऊस झालेला नाही. पावसाअभावी खरीप हंगाम वाया गेला आहे. ऐन पावसाळ्यात या भागात पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरची मागणी वेग धरु लागली आहे. या पार्श्वभूमीवर शिरसाई उपसा जलसिंचन योजनेचे आवर्तन या भागात सोडण्यात यावे, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. 

त्यानुसार (ता. 18) शनिवारी दुपारी शिरसाई उपसा जलसिंचन योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचे 5 विद्युतपंप सुरु करण्यात आले आहेत. या योजनेच्या डाव्या कालव्यातून उंडवडी कडेपठार हद्दीतील बागलखोप येथील तलावात पाणी सोडण्यात येत आहे. थकित पाणी पट्टी पैकी अर्धी व चालु पाण्याची सर्व रक्कम भरल्यानंतरच मागणी नुसार पाणी सोडण्यात येणार आहे. यामध्ये लाभार्थी गावातील पाझर तलाव, नाले व ओढा खोलीकरणात योजनेचे पाणी सोडण्यात येणार आहे. अशी माहिती उपसा सिंचन व्यवस्थापन विभागाचे शाखाअभियंता एल. जी. भोंग व अमोल शिंदे यांनी दिली. 

योजनेच्या पाण्यामुळे दिलासा मिळणार.. 
या भागात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. ऐन पावसाळ्यात विहीर व कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे बहुतांशी कुटूंब पाण्याचे टॅंकर विकत घेत आहेत. योजनेचे पाणी सुटल्यानंतर या भागातील ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com