'तरुणांपुढे खरा इतिहास मांडण्याची गरज '

'तरुणांपुढे खरा इतिहास मांडण्याची गरज '

नाशिक - इंग्रजांचे राज्य सैतानाचे होते. इंग्रजांनी दीडशे वर्षांत सोन्यासह इतरही प्रचंड लूट केली. इंग्रजांनी इतिहासाचे विकृतीकरण केले. चुकीचे भ्रामक सिद्धान्त रूढ केले. ते खोडून खरा इतिहास तरुण पिढीपुढे मांडण्याची गरज आहे, असे मत भागवताचार्य वा. ना. उत्पात यांनी येथे केले. 

मु. शं. औरंगाबादकर सभागृहात श्रीमोहिनीराज भक्तमंडळातर्फे दिल्या जाणाऱ्या "श्रीमोहिनीराज जीवनगौरव पुरस्कार' वितरणप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्ष किशोर गायधनी, चित्रा देव, शौनक गायधनी, दत्तात्रय गायधनी, विनायकराव शुक्‍ल, सुधीर गायधनी उपस्थित होते. 

उत्पात यांच्या हस्ते 75 वर्षे पूर्ण झालेल्या 15 श्रीमोहिनीराज भक्तांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविले. 

उत्पात म्हणाले, की शाळेत चुकीचा इतिहास शिकवला गेला. औरंगजेबाचा इतिहास, तसेच आर्य बाहेरून आले यांसारख्या चुकीच्या गोष्टी शिकवल्या. लोकशाही अयशस्वी झाली म्हणून राजेशाही आली. लोकशाहीत सगळेच नेते असतात. त्यामुळेच ते राष्ट्र लयाला जाते. हा इतिहास नव्या पिढीला सांगितला पाहिजे. भारतीय संस्कृतीचा परिचय करून दिला पाहिजे. 

पुरस्काराचे मानकरी 
रामचंद्र धर्माधिकारी, दिगंबर कुलकर्णी, वासुदेव कुलकर्णी, दामोदर गर्गे, सुमन गायधनी, नारायण गायधनी, शकुंतला चंद्रात्रे, विद्या मोहोळे, पुष्पा देव, नलिनी झेंडे, वसंत गर्गे, निर्मला गायधनी, रामचंद्र जोशी, प्रभावती गायधनी, वसंत गायधनी. 

सावरकरांचे आंतरराष्ट्रीय स्मारक व्हावे 
लोक जसे पंढरपूरची वारी करतात तशी मी नाशिकची वारी करतो. कारण सावरकर माझे दैवत आहे. नाशिक सावरकरांची जन्मभूमी होते. म्हणून येथे सावरकरांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com