कोळशाअभावी वीज कपातीचे संकट; एक दिवसाचा साठा शिल्लक

Power crisis due to lack of coal in chandrapur
Power crisis due to lack of coal in chandrapur

चंद्रपूर : कोळशाच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे चंद्रपूर महाऔष्णिक वीजनिर्मिती केंद्र संकटात सापडले आहे. केवळ एक दिवस पुरेल एवढाच कोळसा शिल्लक आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी वीजनिर्मितीत कपात केली जावू शकते. 

चंद्रपूर जिल्ह्यात बहुतांश कोळसा खाणी भूतल आहेत. पावसाळ्यात त्यात पाणी भरल्याने उत्पादन बंद करावे लागते. वीज केंद्राला कोळसा पुरवठा करणाऱ्या अनेक खाणींमध्ये हीच स्थिती असल्याने वीज केंद्राला होणारा कोळशाचा पुरवठा कमी  होत गेला. परिणामी एक दिवस पुरेल एवढाच कोळसा इथे शिल्लक आहे. वीज केंद्राला रोज ३३ हजार टन कोळशाची गरज आहे. ही गरज रोजच्या रोज पुर्ण केली जात आहे. याशिवाय केंद्राकडे स्वतःचा साठा उपलब्ध नाही. त्यामुळे एखाद दिवशी पुरेसा कोळसा आला नाही तर या केंद्रातील निर्मिती कमी करावी लागेल किंवा ते बंद करावे लागेल, अशी गंभीर स्थिती इथे निर्माण झाली आहे. 

सद्यस्थितीत पद्मापूर, भटाळी, दुर्गापूर खाणीतून ट्रकद्वारे कोळसा पुरवठा होत आहे. यासाठी वेस्टर्न कोलकिल्ड्च्या अधिकाऱ्यांसोबत तातडीची एक बैठक कालच घेण्यात आली. कसेही करून कोळसा पुरवठा नियमत ठेवा, अशी विनंती करण्यात आली. त्यामुळे रोज या केंद्राला गरजेएवढा कोळसा पुरवला जात आहे. त्यामुळे या केंद्रातून सध्या १९७० मेगवॅट वीजनिर्मिती सुरू आहे, असे वीज केंद्राचे उपअभियंता मधुकर परचाके यांनी सांगितले. मात्र, कोळशाचा तुटवडा निर्माण झाल्यास त्यात घट होऊ शकते. ऐन सणासुदीच्या दिवसांत हे संकटनिर्माण झाल्याने नागरिकांना भारनियमनाच्या समस्येला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com