कोरपना (जि. चंद्रपूर) : शेतात कापूस टिबण्याचे काम करीत असतानाच वीज कोसळून एक ठार, तर पाचजण जखमी झाले. ही घटना बुधवारी (ता. १५) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास बेलगावनजीक कोलामगुडा परिसरात घडली. मृतात एका युवतीचा समावेश आहे. मृताचे नाव गौरी खंदेराव कोडापे (वय १६ रा. बेलगाव) असे आहे. जखमीमध्ये मानकु सिडाम (वय १३), आयू कोडापे (वय १३), मनीषा आत्राम (वय १४), निर्मला मडावी (वय १८) आणि साबरी कोडापे (वय २०) यांचा समावेश आहे. जखमींना गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
खरीप हंगामाला आता सुरुवात झाली. कोरपना तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कापसाचे पीक घेतले जाते. तालुक्यातील बेलगाव येथे कोलामगुडा आहे. तेथे कोडापे यांचे शेत आहे. त्यांच्या शेतात कापूस टिबण्याचे सध्या काम सुरू आहे. बेलगाव येथील गौरी खंदेराव कोडापे, मानकू सिडाम, आयू कोडापे, मनीषा आत्राम, निर्मला मडावी आणि साबरी कोडापे या कामावर गेल्या होत्या. दुपारच्या सुमारास अचानक वातावरण बदलून गेले.
वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. तेव्हाच शेतात वीज पडली. त्यात गौरी खंदेराव कोडापे हिचा जागीच मृत्यू झाला. मानकू सिडाम, आयू कोडापे, मनीषा आत्राम, निर्मला मडावी आणि साबरी कोडापे या जखमी झाल्या. या घटनेची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. पोलिस तातडीने दाखल झाले.घटनेचा पंचनामा करून त्यांनी जखमींना गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले. जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.