औरंगाबादमध्ये फळांचे दर स्थिरच, आवेकत चढ-उतार

fruit
fruit

औरंगाबाद: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंबा, मोसंबी, लिंबू, खरबूज, टरबूज, आदी फळांच्या आवकेत चढ-उतार पाहायला मिळाला. परंतु, या फळांचे दर मात्र जवळपास स्थिरच असल्याचे चित्र आठवडाभरात पाहायला मिळाले.

औरंगाबाद बाजार समितीमध्ये ३१ मे ते ७ जून दरम्यान केशरसह विविध प्रकारच्या आंब्यांची ७३ ते १८९ क्विंटल दरम्यान आवक झाली. त्यांना २५०० ते ९५००  रुपये प्रति क्विंटल दरम्यान दर मिळाला. मोसंबीची २० ते ५५ क्विंटल दरम्यान आवक झाली. त्यांना ३०० ते १५०० रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळाला. लिंबांची आवक २० ते ४० क्विंटल दरम्यान झाली. त्यांचे दर ५०० ते २२०० रुपये प्रति क्विंटल दरम्यान  राहिले.  खरबुजाची आवक एक दिवसाचा अपवाद वगळता ४० ते ११० क्विंटल दरम्यान झाली. त्यांना ४०० ते १००० रुपये प्रति क्विंटल दरम्यान दर मिळाला. आठवडाभरात टरबुजाची चार वेळा  १५ ते ५५ क्विंटल दरम्यान आवक झाली. या टरबूजांना ३०० ते ६०० रुपये प्रति क्विंटल दरम्यान दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात  आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com