राज्याचा अर्थसंकल्पही शेतकरी केंद्रित असेल - मुनगंटीवार

पुणतांबा, जि. नगर - शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी निकिता धनंजय जाधव, पूनम राजेंद्र जाधव आणि शुभांगी संजय जाधव या शेतकऱ्यांच्या मुलींनी सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरूच होते.
पुणतांबा, जि. नगर - शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी निकिता धनंजय जाधव, पूनम राजेंद्र जाधव आणि शुभांगी संजय जाधव या शेतकऱ्यांच्या मुलींनी सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरूच होते.

अकोला - राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क हा शेतकऱ्यांचा आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्यसुद्धा भविष्यात मागे राहणार नाही, यंदा राज्याचा अर्थसंकल्प शेतकरी केंद्रित असेल, असे संकेत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे दिले.

अकोला येथील कृषी विद्यापीठाच्या समारंभासाठी मंगळवारी (ता. ५) ते येथे आले होते. या वेळी कृषिमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना मंत्री मुनगंटीवार माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘‘केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी नेहमी खंबीरपणे उभे राहिले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत या देशामध्ये सर्वांत जास्त निधी उपलब्ध करणारे हे राज्य आहे. या राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क हा शेतकऱ्यांचा आहे. हे रयतेचे राज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचार घेऊन हे सरकार चालते आहे आणि म्हणून केंद्राने सहा हजार रुपयांची वार्षिक मदत घोषित केली आहे. राज्य सुद्धा भविष्यात मागे राहणार नाही. जय किसान म्हणत शेतकऱ्यांचा सन्मान वाढवत या राज्यातील शेतकरी, अन्नदाता सुखी भव या भावनेने पुढच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकरी हा केंद्रबिंदू राहील हा विश्‍वास मी शेतकऱ्यांना देतो.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com