

The Banyan Tree Falls: An Era Comes to an End
Sakal
गेल्या वर्षभरात नगरकरांना, मला व माझ्या कुटुंबीयांना तीन मोठे धक्के बसले. वडील अरुणकाकांच्या जाण्याच्या धक्क्यातून अजूनही आम्ही सावरलो नाहीत. माझे छत्र हरपले. त्या दुःखातून सावरत नाही, तोच सासरे शिवाजीराव कर्डिले सर्वांना सोडून गेले. माझे राजकीय दोन्ही गुरू निखळले. आता तर अजितदादांच्या जाण्याने माझे तीनही आधारवड कोसळले आहेत. दादांचा अपघात समजताच काळजात धस्स झाले. ही घटना अजूनही स्वप्नवत वाटते.
संग्राम जगताप, आमदार