

Commissioner Yashwant Dange announces Ahilyanagar’s third consecutive Majhi Vasundhara award victory.
sakal
अहिल्यानगर: राज्य शासनाच्या माझी वसुंधरा ५.० अभियानाअंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेत अहिल्यानगर महापालिकेला सलग तिसऱ्या वर्षी पहिल्या तीन क्रमांकांमध्ये पुरस्कार मिळाला आहे. तीन ते दहा लाख लोकसंख्येच्या गटात अहिल्यानगरला तृतीय पारितोषिक जाहीर करण्यात आले. विशेष मेहनत घेऊन केलेल्या उपाययोजना, तसेच स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत कचरा मुक्त शहराला थ्री स्टार मानांकन, नागरिक व महापालिकेचे सर्व अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे महापालिकेने ही कामगिरी केली असल्याची माहिती आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली.