Ahmednagar : सरकारच्या निर्णयामुळे शाळा सुरू करण्याची लगबग

शाळांची इमारतींच्या स्वच्छतेसह इतर उपाययोजना करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
AHMEDNAGAR
AHMEDNAGARSAKAL

अहमदनगर: राज्यातील कोरोनाचा संसर्ग ओसरू लागला असल्यामुळे राज्य सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शाळांची इमारतींच्या स्वच्छतेसह इतर उपाययोजना करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला आहे. त्यामुळे आता राज्यातील शाळा सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. तशी घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. राज्याच्या ग्रामीण भागातील पाचवी ते बारावी व शहरी भागातील आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग चार ऑक्टोबरपासून सुरू होत आहेत.

अहमदनगर जिल्ह्यात पाचवी ते बारावीच्या शाळा दोन हजार २६ असून, त्यांमध्ये सहा लाख दोन हजार ५१३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या सर्वांना १७ हजार ७९५ शिक्षक अध्यापनाचे काम करीत आहेत. यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक, माध्यमिकच्या अनुदानित, विनाअनुदानित, स्वयंअर्थसाह्य, आश्रमशाळा आदींचा समावेश आहे.

शुक्रवारी शिक्षणमंत्र्यांनी शाळा सुरू करण्याची घोषणा केल्यानंतर आज शनिवारी जिल्ह्यातील अनेक शाळांत, शासनाच्या आदेशानुसार शाळा सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. अनेक शाळांमध्ये आज दिवसभर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली असून, विद्यार्थ्यांच्या स्वागताची तयारी सुरू झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com