Ahmednagar news
Ahmednagar newsesakal

Ahmednagar : कांद्याचे भाव अचानक कोसळले; शेतकरी संतप्त! पुणे-नाशिक रस्त्यावर ठिय्या आंदोलन

फेरलिलाव करण्याचे ठरल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.

संगमनेर : कांद्याचे बाजारभाव अचानक कोसळल्याने शुक्रवारी (ता.८) दुपारी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी संगमनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेटसमोर पुणे-नाशिक रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. यावेळी शेतकऱ्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. फेरलिलाव करण्याचे ठरल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.

Ahmednagar news
Parenting Tips : तुमची मुलं लग्नासाठी नकार देतायत? मग या गोष्टी कारणीभूत असू शकतात

संगमनेर येथील बाजार समितीत गुरुवारी कांद्याला चाळीस ते बेचाळीस रुपयांचा भाव मिळाला होता. त्यामुळे कांदा उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. शुक्रवारी दुपारी बाजार समितीत कांद्याचे बाजारभाव अचानक कोसळले. त्यामुळे शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडीत थेट बाजार समिती बाहेर येत गेट समोर पुणे-नाशिक रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले.

Ahmednagar news
Astro Tips : दुसऱ्याची साडेसाती मागे लावून घ्यायची नसेल तर, कधीच कोणाकडून उधार घेऊ नका या गोष्टी

यावेळी दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी शेतकरी एकजुटीचा विजय असो, कांद्याला हमी भाव मिळालाच पाहिजे, या सरकारचे करायचे काय खाली डोके वर पाय, अशा जोरदार घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

Ahmednagar news
Skin Care Tips: पायाला शेविंग करताना अशा चुका टाळा, अन्यथा त्वचेचे होईल भयंकर नुकसान

यावेळी सभापती शंकर खेमनर, सचिव सतीश गुंजाळ हे शेतकऱ्यांना समजावून सांगत होते. मात्र, शेतकरी कोणाचेच ऐकत नव्हते. प्रथम या ठिकाणी व्यापाऱ्यांना बोलवा, या मागणीवर कांदा उत्पादक शेतकरी ठाम होते. यावेळी घटनेची माहिती समजताच शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवान मथुरे, तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक देविदास ढुमणे, सहायक पोलिस निरीक्षक कल्पेश दाभाडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जवळपास एक ते दीड तासापासून शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन सुरूच होते. त्यामुळे वाहनांच्या दोन्ही बांजूनी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. कांदा व्यापारी आल्यानंतर केंद्र सरकारने निर्यात बंद केल्याने कांद्याचे भाव कमी झाले असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, कांदा उत्पादक आपल्या मागणीवर ठाम होते. फेर लिलाव करण्यात येईल, असे सांगितल्यावर संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले.

व्यापाऱ्यांशी चर्चा करून पुन्हा फेर लिलाव करण्यास सांगितले आहे. शेतकऱ्यांना जास्त पैसे कसे मिळतील याबाबत सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर शनिवारपासून मार्केट बंद राहील, जोपर्यंत मार्केट सुरळीत होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी आपला कांदा मार्केटमध्ये आणू नये. केंद्र व महाराष्ट्र शासनाला विनंती करतो की, अतिशय मोठा दुष्काळा पडला असताना देखील शेतकऱ्यांनी अनेक अडचणींवर मात करून लाल कांदा पिकवला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने निर्यात बंदी करू नये.

- शंकर खेमनर, सभापती, संगमनेर बाजार समिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com