अहमदनगर: आकारी पडीत जमिनी मालकांना द्या

राधाकृष्ण विखे यांची अर्थसंकल्पी अधिवेशनात मागणी
radha krishna vikhe patil
radha krishna vikhe patilsakal

श्रीरामपूर: तालुक्यातील आकारी पडीत जमिनी मूळ मालकांना एक महिन्यात देण्याची कार्यवाही पूर्ण करावी, अशी मागणी आमदार राधाकृष्ण विखे यांनी केली.अर्थसंकल्पी अधिवेशनात आमदार विखे यांनी लक्षवेधीद्वारे श्रीरामपूर येथील आकारी पडीत जमिनीचा प्रश्न उपस्थित केला. वर्षानुवर्षे हा प्रश्न प्रलंबित असल्याने मूळ मालक शेतकरी भूमिहीन होत असल्याची बाब त्यांनी उपस्थित केली. शेतकऱ्यांच्या या जमिनी शेती विकास महामंडळाच्या माध्यमातून सामुदायिक शेतीच्या नावाखाली धनदांडग्यांना देण्याचा घाट घातला जात आहे. याची निविदाप्रक्रिया सुरू आहे का, आतापर्यंत किती जणांना या जमिनी दिल्या, याचा खुलासा शासनाने करावा, अशी मागणी आमदार विखे पाटील यांनी केली.

या जमिनींबाबत रामराजे निंबाळकर समितीने दिलेल्या अहवालाचा उल्लेख करून काही शेतकरी आता आपल्‍या हक्‍काच्‍या जमिनीसाठी न्‍यायालयातही गेले आहेत. परंतु, न्यायालयीन प्रक्रियेत पूर्वी शासनाने एक प्रतिज्ञापत्र सादर केले होते.

आता पुन्हा नव्याने शासनाने प्रतिज्ञापत्र सादर करून, पूर्वी झालेल्‍या निर्णयांशी विसंगत भूमिका कशी काय घेतली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मूळ मालकांना या जमिनी पुन्हा मिळाव्यात, यासाठी कायदेतज्ज्ञांची मदत घेऊन येत्या महिनाभरात या शेतकऱ्यांना जमिनी देण्याची कार्यवाही पूर्ण करा, अशी मागणी त्यांनी केली.

लढ्याच्या आठवणींना उजाळा

या चर्चेदरम्‍यान आमदार राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी खंडकरी शेतकऱ्यांच्‍या लढ्याचा सभागृहात आवर्जून उल्‍लेख केला. शेतकऱ्यांच्‍या हक्‍कासाठी माधवराव गायकवाड, खासदार डॉ. (कै.) बाळासाहेब विखे, (कै.) जयंत ससाणे यांनीही या लढ्यामध्‍ये संघर्ष केल्‍याच्‍या आठवणी सांगितल्‍या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com