Balasaheb Thorat: संकटातील बळीराजाला कर्जमाफी द्या : माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात; सरकारला गांभीर्य नाही

"Former Revenue Minister Thorat: राज्यातील पूरस्थिती गंभीर आहे. शेती वाहून गेली आहे. फळबागांसह खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. उसासारखे पीक देखील झोपून गेले आहे. शेत रस्ते बंद झाले आहेत. पूल तुटले, जागोजागी रस्ते खचले आहेत. शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली आहेत.
Balasaheb Thorat

Balasaheb Thorat

sakal

Updated on

अहिल्यानगर: अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. त्यात मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यांचा समावेश आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. परंतु सरकारला त्याचे कोणतेच गांभीर्य नाही. शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी तत्काळ भरीव मदत आणि कर्जमाफी जाहीर करून शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी, अशी मागणी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com