
संगमनेर: तालुक्याच्या विकासाची वाटचाल करताना प्रत्येक जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेतले. कार्यकर्त्यांची मजबूत फळी हीच खरी ताकद आहे. आज अडचणीचा काळ आहे, अनेकांना त्रास देण्याचे प्रयत्न सुरू आहेत, तरीही कार्यकर्ते डगमगत नाहीत. त्यामुळे विकासाची ही वाटचाल थांबणार नाही, असे प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.