Balasaheb Thorat: निवडणूक आयोगाचा असा गोंधळ कधीच पाहिला नाही: बाळासाहेब थोरात; आयोगाबाबत व्यक्त केली खंत, नेमके काय केले गंभीर आराेप ?

Election Commission: थोरात यांनी सांगितले की, निवडणूक आयोगाने वारंवार अचानक घेतलेल्या निर्णयांमुळे मतदार, स्थानिक प्रशासन आणि उमेदवार सर्वांनाच अनिश्चिततेचा सामना करावा लागत आहे. निवडणूक प्रक्रिया ही अत्यंत पारदर्शक आणि शिस्तबद्ध असावी लागते.
Balasaheb Thorat

Balasaheb Thorat

sakal

Updated on

संगमनेर: ‘‘ माझ्या राजकीय जीवनात इतका गोंधळलेला निवडणूक आयोग मी कधीही पाहिलेला नाही, अशी कठोर टीका माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. पूर्वीचे आयोग स्वायत्त असायचे, निर्णयाचा अधिकार त्यांच्या हातात असायचा आणि सत्ताधारीही त्यांच्या पुढे सावध असत. मात्र आता केंद्रापासून राज्यापर्यंत आयोग सत्तेच्या दबावाखाली काम करत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com