
श्रीरामपूर: बेलापूर ग्रामसभेत गुरुवारी घरकुल योजनेवरून अक्षरशः रणकंदन झाले. ‘लाभार्थ्यांकडून एक लाख रुपये मागितले जात आहेत,’ असा थेट आरोप माजी सरपंच महेंद्र साळवी, सुधीर नवले, भरत साळुंखे यांनी केल्यानंतर ग्रामसभा गोंधळात परिवर्तित झाली. गायकवाड वस्तीतील महिलांनी ‘आमच्या नावावर सात-बारा उताऱ्यासह जमीन द्या, आम्ही कसलेही पैसे देणार नाही,’ अशी घोषणा करताच वातावरण तापले.