अहमदनगर : केंद्र व राज्य सरकारतर्फे जलमिशन योजनेंतर्गत गावांतील कुटुंबांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे. या मिशन अंतर्गत सर्व शाळा व अंगणवाड्यांनाही नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी १०० दिवसांचा कार्यक्रम हाती घेतला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 4780 पैकी 632 शाळा व 5555 पैकी 1545 अंगणवाड्यांना आता नळजोड दिले जाणार आहे.
जलमिशन अंतर्गत प्रत्येक घराला नळजोड देण्याची मोहीम केंद्र व राज्य सरकारने हाती घेतली आहे. त्याचे काम जिल्ह्यात वेगात सुरू आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील सर्व शाळा-अंगणवाड्यांनाही नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी १०० दिवसांचा कार्यक्रम आखला आहे. जिल्ह्यात 4780 शाळा असून, त्यातील 4612 शाळांची राष्ट्रीय योजनेकडे ऑनलाईन नोंदणी झाली आहे.
त्यातील 3980 शाळांना नळाद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, अद्याप 632 शाळांची पाण्यासाठी वणवण सुरू होती. आता शाळांनाही नळाद्वारे पाणीपुरवठा होणार आहे. काही शाळांचे काम अंतिम टप्प्यात आहे. जिल्ह्यातील 5555 पैकी 5243 अंगणवाड्यांची राष्ट्रीय योजनेकडे ऑनलाईन नोंदणी झाली आहे. त्यातील 3698 अंगणवाड्यांना नळाद्वारे पाणी देण्यात येत आहे. 1545 अंगणवाड्यांना अद्याप पाणी मिळालेले नाही. त्यांना आता नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याची प्रकिया सुरू झालेली आहे.
जलमिशन अंतर्गत जिल्ह्यातील अंगणवाडी व शाळांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्याची अंमलबजावणी सुरू आहे.
- राजेंद्र क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदजिल्ह्यातील शाळा व अंगणवाड्यांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याची 100 दिवसांची मोहीम हाती घेतली आहे. हे काम अंतिम टप्प्यात आहे.
- परिक्षित यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जलमिशन अभियान
शाळांची आकडेवारी
एकूण शाळा ः 4780
पाणी उपलब्ध शाळा ः 3980
नळजोड नसलेल्या शाळा ः 632
एकूण अंगणवाड्या ः 5555
पाणी उपलब्ध अंगणवाड्या : 3698
नळजोड नसणाऱ्या अंगणवाड्या ः 1545
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.