
Tragic scene on Ahilyanagar-Savlivihir highway where six people lost their lives in just 12 days.
esakal
राहुरी : अहिल्यानगर-सावळीविहीर राष्ट्रीय महामार्ग प्रवाशांच्या जिवावर उठला आहे. रस्त्यावर खड्डे नव्हे, तर रस्ताच खड्ड्यात गेला आहे. रक्ताचे सडे पडत आहेत. जीवघेण्या अपघातांची मालिका सुरू आहे. मृतांचे नातेवाईक टाहो फोडत आहेत. संतप्त जनता रस्त्यावर उतरत आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून, मृतांच्या नातेवाइकांच्या भळभळत्या जखमांना मीठ चोळले जात आहे. ‘ठेकेदार सुस्त, प्रशासन निद्रिस्त, जनता त्रस्त’ असा कारभार सुरू आहे.