
-समीर दाणी
अहिल्यानगर: जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे गेल्या दोन वर्षांपासून ठेकेदारांची १ हजार २३१ कोटी रुपयांची बिले थकली आहेत. विभागाने मार्च २०२५ पर्यंत केवळ ७ टक्के निधीचे वितरण केले आहे. एकट्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बाराशे कोटींची बिले येणे बाकी आहे. प्रलंबित देयकांसाठी ठेकेदारांचे सरकार दरबारी हेलपाटे सुरू आहेत. इतकी रक्कम थकल्याने ठेकेदार हवालदिल झाले आहेत.