Ahilyanagar News:'दहा दिवसांपासून कपाशी पाण्यात';अतिवृष्टीमुळे निघाले शेतकऱ्यांचे दिवाळे, पेरणीचा खर्च गेला वाया, डाेळ्यात पाणी

Excessive Rain Floods Cotton Crops: अश्विनी वैद्य यांची एकूण पाच एकर जमीन असून यंदा पाऊस चांगला झाल्याने कपाशी, तूर आदी पिके जोमात होती. उत्पन्न चांगल होईल, अशी आशा त्यांना होती. मात्र, गेल्या दहा ते बारा दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत असल्याने पिके पाण्याखाली गेली.
Cotton fields submerged in water for over a week in Solapur, affecting farmers’ livelihood.

Cotton fields submerged in water for over a week in Solapur, affecting farmers’ livelihood.

Sakal

Updated on

शहरटाकळी : अतिवृष्टीमुळे शहरटाकळी परिसरातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. कपाशी, सोयाबीन ही खरिपातील पिके पाच ते सात फूट पाण्यात बुडाल्याने उदध्वस्त झाली आहेत. त्यामुळे काढलेले कर्ज, घेतलेली मेहनत, बियाणे व खतं-औषधं यावर खर्च केलेला खर्च वाया गेला. आता मुलांचे शिक्षण, लेकीबाळींचे लग्न कसे करावे, अशी चिंता शेतकरी वर्गात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com