

संगमनेर: शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपरफुटीची घटना समोर आल्याने महाराष्ट्रातील परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत झाला आहे. ठाण्यात टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याने परीक्षा रद्द करण्याची वेळ आली. तब्बल ४ लाख २८ हजारांहून अधिक उमेदवारांवर अन्याय झाला. ही केवळ पेपरफुटीची घटना नसून, राज्यातील भ्रष्ट आणि ढासळलेल्या परीक्षा व्यवस्थेचे अपयश असल्याची टीका विधान परिषद आमदार सत्यजित तांबे यांनी केली.