5 एकर डाळिंबाचे झाले चक्क 65 लाख! शेतकरी तरुणाची कथा

5 एकर डाळिंबाचे झाले चक्क 65 लाख! शेतकरी 
तरुणाची कथा

रिपोर्ट - तुळसीदास मुखेकर

तिसगाव (जि.अहमदनगर) : शिक्षण बीएस्सी अॅग्री. त्याने पुणे येथे कृषी आयुक्तालयात ७० हजार रुपये महिना असलेली नोकरी सोडली. एका तरुण शेतकऱ्याने ७० हजार रुपये महिन्याची नोकरी सोडून तो आता शेती करत आहे. आणि चक्क 9 लाख रुपये महिन्याला कमावत आहे. वाचा त्याचा थक्क करणारा प्रवास....

भोसे येथील तरुणाचा थक्क करणारा प्रवास...

भोसे (ता. पाथर्डी) येथील शशिकांत भरत शिंदे (वय ३९) या तरुणाचे शिक्षण बीएस्सी अॅग्री. त्याने पुणे येथे कृषी आयुक्तालयात ७० हजार रुपये महिना असलेली नोकरी सोडली. आपल्या वडीलोपार्जित असलेल्या १६ एकर जमिनीवर पारंपरीक बाजरी, ज्वारी, हरबरा आदी पिकांना फाटा देत फक्त फळबाग लागवड केली. त्यामध्ये पाच एकर डाळींब, पाच एकर संत्रा व पाच एकर सिताफळ लागवड केली आहे. उरलेल्या एक एकरवर एक कोटी लिटर पाणी साचेल एवढे शेततळे तयार केले आहे. पाच एकर जमिनीत तीन हजार डाळिंबाची झाडे आहेत. मागील वर्षी ७० टन डाळींब विकले. त्याचे सुमारे ५८ लाख रुपये आले होते. या वर्षी माल जादा आहे, तरीही ७० टन गृहीत धरला, तर या वेळी ११५ रूपये किलो असा दर आहे. सुमारे ७० लाख रुपये होणार आहेत. खर्च पाच लाख रुपये वजा जाता निव्वळ नफा फक्त डाळिंबामध्ये ६५ लाख रुपये वार्षिक होतो. संत्रा बागेची ८०० झाडे आहेत. त्याचे मागील वर्षी ५०टन माल आला होता. ३८ रुपये प्रति किलो भाव मिळाला. त्याचेही १९ लाख रुपये आले होते. गोल्डन सिताफळ आहेत. त्याचे खर्च वजा जाता १३ लाख रुपये वर्षाकाठी येतात. योग्य नियोजन केल्यामुळे शिंदे हे वर्षात एक कोटी रुपये शेतीतून मिळवत आहेत.

७० हजारांची नोकरी सोडून कमवितो महिन्याला नऊ लाख

शिंदे याचे फळपिक घेतानाचे वैशिष्ट्य म्हणजे ते वर्षातून एकच पिक घेतात. आंबे बहार धरतात, मात्र तो थोडा उशीरा धरतात. कारण त्यावेळी बहुतेक शेतकऱ्यांचा माल संपत आलेला असतो. संत्रा हे पिक कमी कष्टात व कमी खर्चात घेता येते, पण पाणी जादा लागते. पाथर्डी हा कायम दुष्काळी असल्याने कमी पाण्याचे पिक घेण्यात येते. त्यामुळे डाळिंबाला पसंती असते. शेतीचे बहुतांश कामे ते स्वतः करतात. त्याला भाऊ व वडील मदत करतात. गरजेपुरतेच मजूर लावतात. स्वतः काम करत असल्याने बागेत होणारा बदल त्यांच्या लक्षात येतो. काय कमी पडले किंवा जादा झाले, हे जाणून ते पुढची दिशा ठरवतात.

फळपीक हे कमी पाण्यात कमी कष्टात जादा उत्पन्न देते. तरुणांनी प्रयोगशिल शेतकरी बनत फळ पिकाकडे वळावे. नोकरीची गरज पडणार नाही. - शशिकांत शिंदे

5 एकर डाळिंबाचे झाले चक्क 65 लाख! शेतकरी 
तरुणाची कथा
जावेद अख्तर यांचे संघाबाबतचे वक्तव्य घृणास्पद - डॉ. कराड
5 एकर डाळिंबाचे झाले चक्क 65 लाख! शेतकरी 
तरुणाची कथा
डॉ. कराड पंतप्रधानांचा विश्वास सार्थ ठरवतील - भास्करगिरी महाराज

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com