Tehsildar Shinde mediating between farmers to resolve the road dispute in Manjarsumba village.Sakal
अहिल्यानगर
Ahilyanagar News: 'अनेक वर्षांचा रस्त्याचा वाद संवादातून संपला'; मांजरसुंबा येथील शेतकऱ्यांचा बांधावर तहसीलदार शिंदेंची मध्यस्थी
Manjarsumba farmers road dispute resolution: प्रत्येक गावातील शेतकऱ्यांना आपल्या शेतावर जाण्यासाठी रस्ता असावा, हे शासनाचे धोरण असून महसूल सप्ताह निमित्त मांजरसुंबा गावातील शेतकऱ्यांनी एकत्रित येत, संवादातून मार्ग काढला. तालुक्यामध्ये १२१ गावे असून प्रत्येक गावात ४ ते १० रस्त्याच्या प्रश्नांचा वाद सुरू आहे.
नगर तालुका: मांजरसुंबा येथील शेतकऱ्यांचा अनेक वर्षांपासून सुरू असलेला वहिवाटी रस्त्याबाबतचा वाद अखेर महसूल विभागाच्या संवादाच्या माध्यमातून निकाली निघाला. महसूल सप्ताहाच्या निमित्ताने तहसीलदार संजय शिंदे यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन रस्त्याचे मोजमाप करून हद्द निश्चित केली आणि प्रत्यक्ष रस्ता तयार करण्यास सुरुवात केली.

