
राहुरी : शहरात आज (गुरुवारी) दुपारी शेकडो शेतकऱ्यांनी जनावरांसह अहिल्यानगर-मनमाड महामार्गावर महावितरणच्या विरोधात पाऊण तास रास्तारोको आंदोलन केले. मुळा धरण परिसरातील विविध गावांमध्ये १५ दिवसांपासून बंद केलेले सर्व कृषी रोहित्रे पूर्ववत चालू करून देण्याच्या आश्वासनानंतर संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.