
अहिल्यानगर: लाडक्या गणरायांचे बुधवारी (ता. २७) घरोघरी आगमन होणार आहे. गणरायाच्या स्वागतासाठी नगरकरांची गेल्या आठ दिवसांपासून लगबग सुरू आहे. शहरातील प्रमुख चौक, रस्ते, वसाहती आणि गणेश मंडप सजावटीने उजळून निघाले आहेत. मंडप उभारण्यासाठी २३४ मंडळांनी महानगरपालिकेकडे अर्ज केले असून, त्यापैकी १४० मंडळांना परवानगी देण्यात आलेली आहे. दरम्यान, गणेशोत्सव शांततेत पार पडावा, यासाठी तीन हजार पोलिस बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहेत.