Ahilyanagar News: सरकारचा शिधा हाेईना अदा! मुख्यमंत्र्यांची पूरग्रस्तांना मोफत धान्याची घोषणा ठरली फुसका बार; प्रशासकीय पातळीवर कार्यवाही नाही

Bureaucratic Delay: परतीच्या पावसाने सप्टेंबर महिन्यात जिल्हा चांगलाच झोडपला. जिल्ह्यात १३ ते २९ सप्टेंबरदरम्यान झालेल्या पावसामुळे अकोले वगळता उर्वरित सर्व तालुक्यांत १ हजार २९१ गावांतील ८ लाख २९ हजार ६६ शेतकऱ्यांचे ५ लाख ६५ हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाले.
Flood victims waiting for government relief; CM’s free grain promise yet to reach the ground.

Flood victims waiting for government relief; CM’s free grain promise yet to reach the ground.

Sakal

Updated on

-गोरक्षनाथ बांदल

अहिल्यानगर: मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्तांसाठी तातडीने २३ किलो मोफत धान्य देण्याची घोषणा केली होती. तथापि, त्याबाबत प्रशासकीय पातळीवर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. पूर ओसरला, तरीही धान्य त्यांच्या घरापर्यंत पोचले नाही. त्यामुळे ही घोषणा ‘फुसकी’ असल्याची भावना लाभार्थ्यांकडून व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com