आजीबाईंची कोरोनावर मात... तर यांचा लढा यशस्वी 

 Grandmother overcame Corona
Grandmother overcame Corona

नगर : श्रीगोंदे तालुक्‍यातील 85 वर्षांच्या आजी आज कोरोनावर यशस्वी मात करून घरी परतल्या. तर, आज जिल्ह्यातील सुमारे वीस जणांचा कोरोनाविरुद्धचा लढा यशस्वी झाला. जिल्ह्यात आतापर्यंत 161 जणांनी कोरोनाविरुद्धचा लढा जिंकला आहे. 

मुंबईहून श्रीगोंदे तालुक्‍यातील कोंडेगव्हाण येथे आलेल्या 85 वर्षीय आजीबाईंना कोरोनाने घेरले. सोबतीला इतर आजारही होतेच. मात्र, मनाचा कणखरपणा, उपचारांना योग्य प्रतिसाद आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर या आजीबाई आज कोरोनातून बऱ्या होऊन घरी परतल्या आहेत. येथील बूथ हॉस्पिटलमधून त्यांना वैद्यकीय तपासणीनंतर आज डिस्चार्ज देण्यात आला. या वेळी हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी त्यांचे कौतुक करीत त्यांना निरोप दिला आणि चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छाही दिल्या. 

या आजीबाई मुंबई येथून 1 जून रोजी गावी आल्या होत्या. त्रास जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मधुमेह आणि इतर आजारांचाही त्रास होत असल्याने, सुरवातीचे तीन-चार दिवस त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्यांना बूथ हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. या उपचारांना आजीबाईंनी चांगला प्रतिसाद दिला आणि ठणठणीत बऱ्या होऊन तिथून बाहेर पडल्या. 
कोरोनातून बरे होऊन त्यांनी, या आजाराला आपण हरवू शकतो, असा आत्मविश्वास इतरांमध्येही निर्माण केला आहे. "लक्षणे जाणवल्यास तत्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन उपचार घेतले पाहिजेत. हा आजार लपवून न ठेवता त्यावर योग्य वेळी उपचार घेतले पाहिजेत. त्याद्वारे रुग्ण त्यातून बरा होऊ शकतो,' हाच संदेश आजीबाईंनी इतरांनाही दिला आहे. 

वीस जण कोरोनामुक्त 
श्रीगोंदे येथील आजींबरोबर अन्य वीस जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये अकोल्याचे सात, नगर महापालिका क्षेत्रातील सात, संगमनेरचे चार, राहाता आणि श्रीगोंदे येथील प्रत्येकी एक एका व्यक्तीचा समावेश आहे. त्यामुळे कोरोनातून बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची जिल्ह्यातील संख्या आता 161 झाली आहे. 

एक जण पॉझिटिव्ह 
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमधून दुपारी पुन्हा सहा जणांचे अहवाल आले. त्यांत पाच जण निगेटिव्ह, तर एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तो सुपे (ता. पारनेर) येथील खासगी कंपनीतील व्यवस्थापक आहे. तो दिल्लीहून प्रवास करून आला होता. त्याला क्वारंटाईन करण्यात आले होते. सर्दी-खोकल्याचा त्रास झाल्यानंतर त्याची तपासणी करण्यात आली. आता जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 227 झाली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com