
"Guardian Minister Radhakrishna Vikhe Patil calls for unified government action to support flood-hit farmers."
Sakal
पाथर्डी: मागील ५०-६० वर्षांत झाला नाही एवढा मोठा पाऊस चालू वर्षी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पाथर्डी-शेवगाव तालुक्यांत एक लाख हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. नालाबंडिंग, पाझरतलाव, बंधारे, रस्ते, पूल यांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाचा सर्व खात्यांनी एकत्रितपणे काम करावे, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.