नगर ः खरिपाचा हंगामाच्या मशागतीच्या कामाला वेग आला असतानाच एक जूनच्या मुहूर्तावर जिल्ह्यातील 83 महसूल मंडलांत पावसाने काल (रविवारी) हजेरी लावली. यापैकी चार मंडलांत अतिवृष्टी झाली. 14 मंडलांत पावसाचे खाते निरंक राहिले. जूनच्या सुरवातीलाच पावसाचे जिल्ह्यात आगमन झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
यंदा हवामान खात्याने समाधानकारक होणार असल्याचे संकेत दिले. मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर पडणारा पाऊस खरिपाच्या हंगामासाठी चांगल्या उत्पन्नाची हमी देतो. कोरोना महामारीच्या संकटातही खरिपाच्या पूर्व मशागतीची कामे सुरू होती. त्यातच बळिराजाचे डोळे पावसाकडे लागले होते.
हेही वाचा ः नगरमध्ये येणार पूर
31 मेची रात्री सरत असताना एक जूनचा मुहूर्त गाठत पावसाने जिल्ह्यात आगमन केले. जिल्ह्यातील 97 पैकी 83 मंडलांत पावसाने हजेरी लावली. राहाता, शिर्डी, संगमनेर, तळेगाव, समनापूर, अकोले, राजूर, ब्राह्मणवाडा, समशेरपूर, गिरगाव, साकिरवाडी, पोहेगाव, शिलेगाव, रवंदे या चौदा महसूल मंडलांत पावसाचे खाते निरंक राहिले.
पावसाने दिलासा दिल्याने आज सोमवार रोजी जिल्ह्यातील बहुतांश बाजारपेठात बियाणे, खते आणि पेरणीविषयक वस्तूंच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी दिसून आली. दरम्यान, शासकीय आकडेवारीनुसार पावसाची सरासरी 27.76 इतकी आहे.
अतिवृष्टी झालेले मंडल (मिलीमीटरमध्ये)
बेलवंडी-66
श्रीरामपूर-71
टाकळीभान-70
सलाबतपूर-97
धरणातील पाणीसाठी (टक्केवारीत)
भंडारदरा-35.18
मुळा-28.62
निळवंडे-44.33
आढळा-38.96
मांडओहळ-22.96
घाटशीळ-4.50
खैरी-7.50
सीना-20.21
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.