
अहिल्यानगर: छावणी परिषदेमुळे भिंगारचा म्हणावा तसा विकास झाला नाही. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच भिंगारमध्ये नव्याने नगरपालिका करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता भिंगारच्या विकासाचा मार्ग खुला झाला आहे. लवकरच नव्या नगरपालिकेच्या निवडणुकाही होतील. या निवडणुकीत पहिला नगराध्यक्ष हा भाजपचाच झाला पाहिजे, यासाठी आजपासूनच नियोजन करा, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.