
अहिल्यानगर: जिल्ह्यातील निराधारांच्या योजनांचे पैसे थेट बँक खात्यावर जमा केले जाते. अनेकांचे केवायसी अपूर्ण असलेल्या लाभार्थ्यांना पैसे मिळण्यात अडचणी येत आहेत. जिल्ह्यात १ लाख ४९ हजार २६७ लाभार्थी आहेत. सध्या ९ हजार ७०४ लाभार्थ्यांचे आधार केवायसी पूर्ण झालेली नाही. त्यामुळे या लाभार्थ्यांचे पैसे खात्यावर जमा होत नाहीत. यातील बहुतांशी लाभार्थी जिल्ह्यात राहत असल्याने त्यांचा संपर्कही होत नसल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे.