

MLA Amol Khatal
Sakal
संगमनेर : संगमनेर नगरपरिषद निवडणुकीत महायुती बहुमताने विजयी होणार आहे. हा विजय फक्त आणि फक्त सर्वांगीण विकासासाठीच असेल, असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, तर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखेपाटील असे सशक्त नेतृत्व असताना विकासाची गती तीन पटीने वाढली आहे आणि त्याचा थेट लाभ संगमनेरला मिळणार आहे.