
-सचिन सातपुते, राजू घुगरे
शेवगाव: ‘‘मराठा आरक्षणासाठी ही आरपारची लढाई आहे. आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईहून परतणार नाही. ज्यांना शक्य आहे, त्यांनी आमच्यासोबत मुंबईला चला. जे मागे राहतील त्यांनी मागची धुरा सांभाळा. शेवगावकरांच्या अभुतपूर्व प्रतिसादामुळे आपण अर्धी लढाई जिंकली आहे. लेकराबाळांच्या कल्याणासाठी अशीच एकजूट दाखवा,’’ असे आवाहन मराठा आरक्षणासाठी मुंबईस निघालेले मनोज जरांगे यांनी केले.