
“MLA Shivaji Kardile oversees accelerated panchanama work to provide pre-Diwali assistance to farmers.”
Sakal
अहिल्यानगर: पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारने ३१ हजार ६२८ कोटींचे पॅकेज दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्परता दाखवून शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच निधी वर्ग करण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मदत मिळेल, अशी माहिती आमदार शिवाजी कर्डिले यांनी पत्रकार परिषदेत दिली.