

MP Supriya Sule criticizes Maharashtra government; says no funds available for loan waiver, Jal Jeevan Mission in poor shape.
Sakal
संगमनेर: सरकार म्हणते दिवाळी गोड करू, पण गोड कोणाची झाली? तुमची झाली असेल, कारण शक्तिपीठ महामार्गासाठी तुमच्याकडे तब्बल ८० हजार कोटी रुपये आहेत. पण शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्यासाठी दहा ते वीस हजार कोटी रुपये नाहीत. आता म्हणतात, आम्ही कर्जमाफीबद्दल कधीच बोललो नव्हतो, असा जोरदार हल्लाबोल खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर चढवला.