

National Honour for Dr. Kailas Shinde; Navi Mumbai’s Water Management Earns Central Recognition
Sakal
-सुहास वैद्य
कोल्हार: सात्रळ (ता. राहुरी) येथील भूमिपूत्र व नव्या मुंबईचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी पाणीपुरवठ्याचे केलेले सुयोग्य नियोजन, राबविलेली वितरण व्यवस्था आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यावर दिलेला भर, याची दखल भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने घेतली. मंत्रालयातर्फे आयोजित सहावा व देशात प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय जल पुरस्कार स्थानिक स्वराज्य संस्था श्रेणीत नवी मुंबई महानगरपालिकेस विशेष समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.