Pathardi : पालिकेच्या टँकरवाल्याने खासगी व्यक्तीच्या घरात संपूर्ण टँकर खाली केल्याने दोन महिलांमध्ये हाणामारी

दोन दिवसांपूर्वी पाथर्डी शहरातील उपनगरामध्ये पाणी कोणी भरायचे या मुद्यावरून दोन महिलांमध्ये चक्क हाणामारी झाली आहे. हा वाद पोलिस ठाण्याच्या दारात पोहचला आहे.
Pathardi News
Pathardi NewsSakal

Pathardi : उन्हाळा दोन महिने अजून शिल्लक असताना शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणचे कूपनलिका सध्याच आटल्याने दोन महिने कसे काढायचे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे, तर दोन दिवसांपूर्वी शहरातील उपनगरामध्ये पाणी कोणी भरायचे या मुद्यावरून दोन महिलांमध्ये चक्क हाणामारी झाली आहे. हा वाद पोलिस ठाण्याच्या दारात पोहचला आहे.

पालिका हद्दीत असलेल्या हंडाळवाडी येथे पालिकेच्या मालकीच्या टँकरने आम्हाला पाणी न देता ओळखीच्या माणसाला पूर्ण टँकर पाणी दिल्याने संतप्त झाले. नागरिकांनी पालिका कर्मचाऱ्यांशी वाद घातला. सध्या जिल्ह्यात सर्वाधिक पाण्याचे टँकर हे पाथर्डी तालुक्यात आहे. शहराला जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा केला जातो.

मात्र, साधारणतः पाच ते सहा दिवसांनी हा पुरवठा केला जात असल्याने पाणी जपून वापरण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. पाथर्डी शहरात हजारोंच्या संख्येने कूपनलिका असल्याने ऐन उन्हाळ्यात पालिकेचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला, तरीही कूपनलिकेच्या मोठ्या संख्येने फारशी पाणीटंचाई जाणवत नव्हती. मात्र, आता अनेक कूपनलिका आटल्याने भविष्यात शहराच्या मुख्य भागाला सुद्धा टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार आहे.

Pathardi News
Water Shortage : पुणे जिल्ह्यात पाणीबाणी! गावे व वस्त्यांमध्ये टँकर सुरू करण्याची वेळ आली प्रशासनावर

सध्या शहराच्या जवळपास सर्वच उपनगरांना टँकरने पाणीपुरवठा चालू असून दोन दिवसांपूर्वी हंडाळवाडी येथील वाड्यावस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा करणाऱ्या पालिकेच्या एका टँकरवाल्याने खासगी व्यक्तीच्या घरात संपूर्ण टँकर खाली केल्याने संतप्त झालेल्या वस्तीवरील महिला व नागरिकांनी पालिकेच्या कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. एक उपनगरात पाणीपुरवठा होत असताना दोन महिलांमध्ये हाणामारी झाली.

Pathardi News
Madhi Temple Pathardi: मढी देवस्थानच्या कर्मचाऱ्यांना मारहाण,पशुहत्येस विरोध केल्याचा राग; चार ते पाच जणांवर गुन्हा दाखल

दोन्ही महिला गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यात गेल्या. मात्र, काही मध्यस्तांनी मध्यस्ती करत वादावर पडदा टाकल्याने गुन्हा दाखल झाला नाही. सध्याच अशी पाणीबाणी निर्माण झाल्याने पुढचे दोन महिने कसे जाणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

पाण्यासाठी झुंबड

टॅंकर आल्यानंतर पाणी भरण्यासाठी शहरातील नागरिकांची झुंबड उडत असते. गेल्या काही दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे. त्यामुळे वादावादीचे प्रसंग घडत आहे. शहरात टॅंकरची संख्या वाढविण्याची मागणी होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com