Ahilyanagar News: बळीराजाला पुन्हा उभे करा; भाकप, किसानसभेची मागणी, पांढरीपूल रस्त्यावर आंदोलन

Peasant Groups Demand Farmer Empowerment: सरकारी आकडेवारी २७ लाख हेक्टर शेती बाधित झाल्याचे दाखवते. पण प्रत्यक्षात ७० लाख हेक्टरपेक्षा जास्त शेती पाण्याखाली गेली आहे. उभी पिके वाहून गेली, जनावरांचे मृत्यू झाले आणि अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. सरकारने तुटपुंजी मदत जाहीर करत तोंडाला पाने पुसली आहेत.
Farmers from KBP and Kisan Sabha rally on Pandharipool Road, demanding revival of the ‘Farmer King’ legacy and agricultural reforms.

Farmers from KBP and Kisan Sabha rally on Pandharipool Road, demanding revival of the ‘Farmer King’ legacy and agricultural reforms.

Sakal

Updated on

अमरापूर: अतिवृष्टी आणि पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या न्याय द्या, बळीराजाला पुन्हा उभे करा, अशी मागणी करत भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभेच्या वतीने सामनगाव (ता. शेवगाव) येथे शेवगाव-पांढरीपूल रस्त्यावर आज (ता. ९) रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी शासन विरोधी घोषणाबाजी करत नुकसानग्रस्त शेतीला प्रतिहेक्टरी ७० हजार रुपये मदत देण्याची मागणी केली. 

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com