सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू आहे. या मुद्यावर अजित पवार यांनी जगताप यांना भेटीसाठी बोलविले आहे. त्यांचं म्हणणं आपण समजून घेणार आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. या पार्श्र्वभूमीवर जगताप यांच्याशी ‘सकाळ’ने संपर्क साधला असता, त्यांनी मुंबईतील बैठकीला न जाण्याचे कारण स्पष्ट केले.
अहिल्यानगर : ‘‘गेल्या चार दिवसांपासून शहरात दिंड्या येत आहेत, त्यामुळे पक्षाच्या कालच्या (मंगळवारी) मुंबईतील बैठकीला उपस्थित राहू शकलो नाही. तशी माहिती मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिली होती, असे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले.