

Rising Road Accidents Make Ahilyanagar Most Unsafe District for Passengers
-अरुण नवथर
अहिल्यानगर: अपघाताच्या घटनांमध्ये जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. गेल्या दोन वर्षात हे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांवर ७८१, तर राज्यमार्गावर १०३९ अपघात झाले. त्यात तब्बल दोन हजार सात प्रवाशांचा मृत्यू झाला, तर शेकडोंना कायमचे अपंगत्व आले. वारंवार होणाऱ्या अपघाताकडे प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे. अपघातांना कारणीभूत ‘ब्लॅक स्पॉट’ अविकसितच आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढत आहेत.