
-समीरण बा. नागवडे
श्रीगोंदे : तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी श्रीगोंदे शहरातील रस्त्यांना पडलेले खड्डे, खराब दुभाजक, अस्वच्छता आदी मुद्द्यांवर तीन वर्षांपूर्वी नगरपरिषदेचे अक्षरशः वाभाडे काढले होते. तीन वर्षांनंतर पवार पुन्हा श्रीगोंद्यात येत आहेत. मात्र, आजही शहरातील परिस्थिती जैसे थेच असल्याची शोकांतिका आहे.