
शिर्डी : महाराष्ट्रात मतदारयाद्यात मतदार वाढले, तर कुठे गायब झाल्याच्या तक्रारी आहेत. हिच परिस्थिती काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात देखील आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मतदारसंघात काही लाख मतदार गायब असतील, तर त्यांनी आणि सध्या मतदार याद्यांवर आक्षेप घेणाऱ्या खासदार राहुल गांधी यांनीही निवडणूक आयोगासमोर प्रतिज्ञापत्र दाखल करावे.