'विद्यापीठांतील नियुक्त केलेले कुलगुरू एका राजकीय विचारांचे असल्याने कायदा बदलला'

विद्यापीठ कायदा दुरुस्ती विधेयकाबाबत महसूलमंत्र्यांचे स्पष्टीकरण
balasaheb-thorat
balasaheb-thoratesakal

संगमनेर : राज्यातील विद्यापीठांतील नियुक्त केलेले कुलगुरू (Vice-Chancellor)एका राजकीय विचारांचे होते. लोकशाहीला अभिप्रेत नसलेली ही नेमणूक होती. कुलगुरू हे व्यापक पद आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात काम करणारे कुलगुरू एका विचारसरणीशी निगडीत व कडवे असतील, तर त्याचे दुष्परिणाम होणारच. कुलगुरू राज्यघटनेतील तत्वाने चालणारा असावा, त्यासाठी महाविकास आघाडी सरकारने राज्यात विद्यापीठ कायदा दुरुस्ती विधेयक(University Law Amendment Bill) आणले, अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात(Revenue Minister Balasaheb Thorat) यांनी दिली.

balasaheb-thorat
वाशिष्ठीचे उत्पन्न झाले पन्नास टक्के कमी; २ गटात ४०० ब्रास वाळू उपसाची परवानगी

सकाळ’शी विविध विषयांवर त्यांनी मुक्त संवाद साधला. विद्यापीठअंतर्गत नेमलेल्या समितीने अनेक कुलगुरू भाजप व आरएसएसच्या विचारसणीचे असल्याचा निष्कर्ष अहवालात काढला आहे. याबाबत विचारले असता, थोरात म्हणाले, हे खरे आहे की नेमलेले कुलगुरू एका राजकीय विचारांचे होते. आपल्या लोकशाहीला अभिप्रेत नसलेली ही नेमणूक होती. कुलगुरू हे व्यापक पद आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात काम करणारे कुलगुरू एका विचारसरणीशी निगडीत व कडवे असतील, तर त्याचे दुष्परिणामच होणार. म्हणून त्याबाबतीत निर्णय करण्यात आले. कुलगुरू राज्यघटनेच्या तत्त्वाशी एकनिष्ठ असावा, यासाठी विद्यापीठ कायदा दुरुस्ती विधेयक आणले आहे.

balasaheb-thorat
शाळा, महाविद्यालय बंद निर्णयाचा फेरविचार करावा; आ.सतीश चव्हाण

भूसंपादन कायद्यात केलेल्या बदलांबाबत बोलताना ते म्हणाले, यूपीए सरकारने २०१३ साली भूसंपादनात शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळावा, यासाठी कायद्यात बदल केले. राष्ट्रीय महामार्गांच्या रुंदीकरणासाठी जमिनीचे संपादन करताना दिला जाणारा मोबदला अवास्तव असल्याचे मत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने व्यक्त केले होते. तसेच हा मोबदला शेजारील इतर राज्यांच्या बरोबरीत व योग्य प्रमाणात द्या. अन्यथा राज्यात कोणतेही काम करणार नसल्याचे सांगितले होते. त्यावर केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत, राज्यात जास्तीत जास्त महामार्गांची कामे करण्याची अपेक्षा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्रिमंडळाने केली होती. त्यानुसार वस्तुस्थिती पाहून, हे बदल करण्यात आले आहेत. मात्र जुन्या सुरू असलेल्या कामांसाठी जुन्याच पद्धतीने मोबदला दिला जाणार आहे, असेही ते म्हणाले.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत सत्ता आल्यानंतर केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी स्व. बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या प्रतिमा काढून टाकल्या. त्यावर बोलताना ते म्हणाले, राणे केंद्रीय मंत्री आहेत. त्यामुळे त्यांची भूमिका व्यापक असायला हवी. जिल्हा बँकेत सर्वांचे फोटो असल्याने काही बिघडलं नसतं, असं मला वाटतं, असेही ते शेवटी म्हणाले.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत (sindhudurga district bank)सत्ता आल्यानंतर केंद्रीयमंत्री नारायण राणे(central minister narayan rane) यांनी स्व. बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या प्रतिमा काढून टाकल्या. त्यावर बोलताना ते म्हणाले, राणे केंद्रीय मंत्री आहेत. त्यामुळे त्यांची भूमिका व्यापक असायला हवी. जिल्हा बँकेत सर्वांचे फोटो असल्याने काही बघडलं नसतं, असं मला वाटतं, असेही ते शेवटी म्हणाले.

balasaheb-thorat
'कोरोना लस व्यक्तीच्या संमतीशिवाय दिली जाऊ शकत नाही' - केंद्र सरकार

मते व्यक्तीद्वेषी नसावीत

आम्ही सगळ्याच राजकारणी व पक्षप्रमुखांनी काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. लोकशाहीच्या राजकारणात मतमतांतरे राज्यघटनेला अभिप्रेत आहेत. मात्र आपली मते व्यक्तीद्वेषाची, व्यक्तीगत पातळीची किंवा खालच्या पातळीची नसावीत, या मताचे आपण असल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात(revenue minister balasaheb thorat) म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com