

Minister Naharhari Zirwal confirms upcoming Maharashtra elections to be held under Mahayuti alliance; six-member panel to take final call.
Sakal
संगमनेर: राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती म्हणूनच निवडणुका लढण्याची चर्चा वरिष्ठ स्तरावर सुरू आहे. त्यावर अंतिम निर्णय घेण्यासाठी सत्तेतील तिन्ही पक्षांनी मिळून सहा राज्यस्तरीय सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीने घेतलेल्या निर्णयावर वरिष्ठ नेत्यांचा शिक्का लागल्यानंतर आदेश प्रसिद्ध होतील, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली.