
Residents in Ahilyanagar struggle with water shortage despite 44 crore spent on water supply projects.
Sakal
अहिल्यानगर: कुठे अनियमित, तर कुठे कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नगरकर त्रस्त झाले आहेत. महापालिकेने घरगुती पाणीपट्टीत ९०० रुपयांची वाढ केलीय. वाढीव पाणीपट्टी भरूनदेखील वेळेत आणि पुरेसे पाणी मिळत नसल्याने नगरकर महापालिकेच्या या अनागोंदी कारभाराविरोधात संताप व्यक्त करत आहेत. काही ठिकाणी, तर व्हॉल्व्हमन मनमानी करीत आहेत. त्यांच्यावर वरिष्ठांचा वचक राहिलेला नाही. त्यामुळे पाणीबाणी झालेली आहे.