अकोला : रासायनिक खतांच्या भावामध्ये वाढ

शेतकरी आर्थिक कोंडीत, बजेट कोलमडला
Akola inflation Rising prices of chemical fertilizers
Akola inflation Rising prices of chemical fertilizerssakal

रिसोड : खरीप हंगाम सुरू होण्याआधीच रासायनिक खतांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, खत कंपन्यांकडून दरवाढ होणार नाही, असे सांगण्यात आले होते, परंतु भाववाढ झाल्याने शेतकऱ्यांमधून कमालीची नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. आधीच शेतकऱ्यांच्या मालास भाव मिळत नसल्याने आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांचे येत्या खरीप हंगामात रासायनिक खतांच्या भाववाढीमुळे आर्थिक बजेट नक्कीच कोलमडणार आहे.

खरीप हंगाम अवघ्या एक दोन आठवड्यावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीतील मशागतीची कामे सुरू केली आहेत. रासायनिक खतांचे दर गगनाला भिडले आहेत; पण शेतमालाला मिळणारा भाव बघता हा भाव शेतकऱ्यांना परवडणार नाही. यावर्षी पुन्हा रासायनिक खतांचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडणार आहे.

रिसोड तालुक्यात खरिपाची पेरणी जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात सुरू होत असते. तत्पूर्वी, शेतकऱ्यांनी शेतातील नांगरणी, वखरणी यासारखी उन्हाळ्यातील कामे करायला सुरुवात केली आहे. शेतकरी वेळेवर धांदल होऊ नये म्हणून मे महिन्याच्या अखेरीस बी-बियाणे, खते खरेदी करून ठेवतात. त्यामुळे दुकानदारांनी देखील खते व बी-बियाणेची संबंधित कंपनीकडे नोंदणी केली आहे. शेतकरी डीएपी हे खत मोठ्या प्रमाणात पिकांना देतात.

यावर्षी खताचे भाव वाढल्याने खत मिळेल की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. मागील वर्षी डीएपी खताची बॅग १२०० रुपयाची होती आता ती वाढली असून त्याला आता ३०० ते ५०० रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. गतवर्षी डीएपी खताच्या किंमती १२०० रुपये प्रति बॅग होत्या. यंदा शेतकऱ्यांना प्रतिबॅग ३०० ते ५०० रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. डीएपी सोबत इतर सर्वच मिश्र खतांच्या किंमती वाढल्या आहेत.

सुपर फास्फेट पोटॅश आदी खतांच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड पडणार आहे. वर्षभरात कपाशी पिकाला तीन वेळा खत द्यावे लागते. सोयाबीन पिकाला एकरी एक बॅग खताची आवश्यकता असते. खताच्या किंमतीत सरासरी २५ ते ३० टक्के वाढ झालेली आहे. या भाववाढीचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.खतासोबत कीटकनाशकांचीही दरवाढ

खताच्या किंमतीसोबतच तणनाशक, कीटकनाशक यांच्या भावात देखील वाढ झाली आहे. एकूणच उत्पादन खर्च वाढणार आहे आणि शेत मालाचे भाव या तुलनेने कमी वाढत आहे. शिवाय नैसर्गिक संकटाचा फटका पिकांना बसत असतो. येणारे उत्पन्न आणि होणारा खर्च याचा ताळमेळ बसवताना शेतकऱ्यांना कसरत करावी लागणार आहे. इंधन दरवाढीमुळे मशागतीचे दर वाढले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे भाव दररोज वाढत आहेत. त्यामुळे ट्रॅक्टर मालकांनी आपले दर देखील वाढवले आहेत.

अंतर मशागतीचा खर्च सरासरीपेक्षा दीड पटीने वाढला आहे. बहुतेक शेतकरी आता मशागत नांगरणी, फंटण, रोटावेटर, पणजी पेरणी आदी कामे ट्रॅक्टरने करतात. पण आता भाव वाढल्याने शेतकऱ्यांचे बजेट कोलमडणार आहे. त्यामुळे वाढलेल्या भावावर नियंत्रण आणणे अत्यंत गरजेचे असून शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेऊन रासायनिक खतांचे भाव कमी करण्याची मागणी शेतकरी करताना दिसत आहे.

खताचे भाव अचानक वाढल्याने शेतकरी संभ्रमावस्थेत सापडला असून, संबंधित काही दुकानदार हे खताची विक्री चढ्या भावाने करीत असतात. तरी संबंधित दुकानदाराने खत विक्री दुकानात खतांचे किमतीचे दरफलक लावावे, जेणेकरून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होणार नाही.

-गजाननराव बाजड सरपंच व प्रगतशील शेतकरी, नावली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com