अकाेला : कुटासा परिसरात वन्यप्राण्यांचा हैदोस

पेरणी केलेले कपाशीचे पीक फस्त; तालुक्यातीलव शेतकरी चिंताग्रस्त
Wildlife
Wildlifeesakal

तरोडा - आता कुठ मॉन्सूनने अकोला जिल्ह्यात हजेरी लावायला सुरुवात केली. त्यामुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना आनंद मिळाला असला, तरी हा आनंद त्यांचा काही क्षणापूरताच राहिल्याचे दिसून आले. कुटासा परिसरात गत दोन-चार दिवसाआधी पेरणी केलेले कपाशीचे पीक वन्यप्राण्यांनी फस्त केल्याची प्रकार घडल्यामुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे बोलले जात आहे.

अकोट तालुक्यातील कुटासा शेतशिवारात येथीलच शेतकरी राजेश मालवे यांनी दोन एकर शेतात ता. ४ जुलै रोजी कपाशी पिकाची पेरणी केली होती. त्यानंतर कुटासा परिसरात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतातील पीक उगवेल, अशी अपेक्षा मालवे यांना होती. परंतु, ता. ८ जुलै रोजी शेतातील पेरणी केलेले पीक उगवले की, नाही याची पाहणी करण्यासाठी मालवे शेतात गेले असता, त्यांचा भ्रमनिराश झाला. पेरणी केलेल्या शेतात सर्वकडे वन्यप्राण्यांच्या पायाचे ठस्से, त्यांनी पायाच्या सहाय्याने खोदून ठेवलेल्या जमिनीमुळे त्यांच्या लक्षात आले की, शेतात वन्यप्राण्यांचा कळप आला आणि पेरणीची सर्व वाट लावली.

त्यामुळे गत चार दिवसाआधी पेरणी केलेली कपाशी आपल्या हातून गेल्यामुळे मालवे आर्थिक संकटात सापडले. पिकाची अशी दुर्दशा पाहून त्यांना तत्काळ अकोट वर्तुळातील वन कर्मचाऱ्यांना घटनेची माहीती दिली. घटनेची माहिती मिळताच अकोट वर्तुळातील वन कर्मचाऱ्यांनी शेतात येऊन नुकासानीची पाहणी केली. वन्यप्राण्यांमुळे नुकसान झाल्यामुळे आपण वन्यप्राण्यांचा बदोबस्त करावा, अशी मागणी मालवे त्यांच्याकडे केली.

कुटासा परिसरातील शेतातील काही प्रमाणात निघालेले पिकांचे कोवळे अंकुर वन्यप्राणी खात असल्याने शेतकऱ्यांवर नवे संकट उभे ठाकले आहे. तरोडा, कुटासा व इतरही शेतशिवारात वन्यप्राण्यांचा कळप फिरत असून, त्यांच्याकडून शेतातील पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे, त्यामुळे वन विभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी कुटासा परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

मी, दोन एकर शेतात कपाशी पिकाची लागवड केली होती, मात्र वन्यप्राण्यांनी दोन एकरातील कपाशीचे पीक फस्त केले त्यामुळे माझे अदांजे एक लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. वन विभागाने वन्यप्राण्यांचा बदोबस्त करावा.

- राजेश मालवे, नुकसानग्रस्त शेतकरी, कुटासा.

जमिनीच्यावर निघालेले कपाशी पिकांचे कोवळे अंकुर वन्यप्राणी फस्त करत आहेत, त्यामुळे पिकांचे रक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना रात्री-बे-रात्री शेतात जावे लागत आहे.

- किरण नवलकार, शेतकरी, कुटासा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com